काल मी कांमतीला जाऊन आले .कारण सुरेश वारला हे. तसा काय संबध आमचा? माझ्या वाहिनीचा भाऊ. वय वर्षे ३८-४० फार तर. त्याची बायको, २ मुले कशी राहतील सगळे, कुणाचे काही राहत नाही हे मला माहित आहे, तरीही कसे होईल त्यांचे हे मात्र जाणवत होते.
तिथली परिस्थिती सिनेमात दाखवतात तशी अगदी, मोठे ५-६ खोल्यांचे घर पण तो राहत होता ते गुरांच्या गोठ्यात, का? याला उत्तर नाही म्हणजे मला माहित नाही. घरात एका बाजूला शेळ्या बांधलेल्या, तिथेच फ्रीज, वाशिंग मशीन बांधून ठेवलेले. न दवाखान्यात जाण्यासाठी केलेली टाळाटाळ, पैसे नाहीत म्हणून. काय समजायचे काळात नवते. घरात पोचवून आल्यावर भात पिठले करायचे तर तांदूळ घरात नाहीत. की परिस्थिती आहे, खरेच इतकी हलकी कि .... मन अस्वस्थ. त्याला याची उत्तरे माहित नाहीत. का असे घडत होते? आता पुढे काय घडेल? त्या बाईला तिथे नीटपणे राहता येईल कि कसे तरी दिवस काढावे लागतील? काय घडेल? काय निर्णय घेतील सगळेजण. माझ्यावर आशीच वेळ आली तेव्हा मला नोकरी असल्याने बाकी निर्णय काही घ्यायचे नव्हते. ईथे सारी जबाबदारी कोण घेणार?भावाभावांचे पटत नव्हते पण आता तो जबाबदारी घेईल का? मुलांचे शिक्षण पार पडेल कि मधेच बंद होईल. मुलगा खूपच लहान आहे, त्याला नीटपणे सांभाळले जाईल का? कि काही वेगळे घडेल? जेवढा विचार करावा तेव्ह्डे डोके गरगरायला लागते आहे.
एकट्या बाईने दिवस निभावणे खरेच आवघड
तिथली परिस्थिती सिनेमात दाखवतात तशी अगदी, मोठे ५-६ खोल्यांचे घर पण तो राहत होता ते गुरांच्या गोठ्यात, का? याला उत्तर नाही म्हणजे मला माहित नाही. घरात एका बाजूला शेळ्या बांधलेल्या, तिथेच फ्रीज, वाशिंग मशीन बांधून ठेवलेले. न दवाखान्यात जाण्यासाठी केलेली टाळाटाळ, पैसे नाहीत म्हणून. काय समजायचे काळात नवते. घरात पोचवून आल्यावर भात पिठले करायचे तर तांदूळ घरात नाहीत. की परिस्थिती आहे, खरेच इतकी हलकी कि .... मन अस्वस्थ. त्याला याची उत्तरे माहित नाहीत. का असे घडत होते? आता पुढे काय घडेल? त्या बाईला तिथे नीटपणे राहता येईल कि कसे तरी दिवस काढावे लागतील? काय घडेल? काय निर्णय घेतील सगळेजण. माझ्यावर आशीच वेळ आली तेव्हा मला नोकरी असल्याने बाकी निर्णय काही घ्यायचे नव्हते. ईथे सारी जबाबदारी कोण घेणार?भावाभावांचे पटत नव्हते पण आता तो जबाबदारी घेईल का? मुलांचे शिक्षण पार पडेल कि मधेच बंद होईल. मुलगा खूपच लहान आहे, त्याला नीटपणे सांभाळले जाईल का? कि काही वेगळे घडेल? जेवढा विचार करावा तेव्ह्डे डोके गरगरायला लागते आहे.
एकट्या बाईने दिवस निभावणे खरेच आवघड