Wednesday, September 12, 2012

kalay tasmeyn maha

आज   किती दिवसांनी लिहिण्यासाठी बसले आहे . काय लिहायचे ते न ठरवताच लिहिते आहे. खूप disturb आहे, पण office मध्ये येते आहे न कामात स्वतःला गुंतवते आहे म्हणून स्थिर दिसते आहे. का आसे घडत असेल माझ्या बाबतीत ? का साधे, सरळ आयुष्य माझ्या वाट्याला येत नसेल, खूप काही आपेक्ष्या ठेवल्या का? कुठे चुकत गेले माझे, मी समोरच्याचा जास्त विचार करते म्हणून आसे घडते का? मला सुख लागले पाहिजे समोरच्याचा नाही विचार करायचा असे ठरवले तर आपल्याला खरेच सुख लागते का? कि हे हि मनुष्या सापेक्ष आस्ते. मुलाचे सुख बघायचे म्हणून मी माझे घर सोडून बाहेर पडले, इथे मी चुकले का? तिथेच तसेच भांडत न एकमेकांवर कुरघोडी करत जगायचे होते का? खरेच नाही लक्षात येत, सचिनला मी फोनेने सुधा बोलणे बंद करायला सांगितले, त्या गोष्टीचा मला जास्त त्रास होतो की तो जी चैकशी करायचा ती फक्त त्या वेळेपुर्तीच  आहे, तिथे मला खरेच आडचण  आली तर तो काही करेल हे कसे गृहीत धरू मी, जो बायकोला माझी आई इथेच राहणार हे नाही सांगू शकत त्यावर काय बोलू मी. आपले नशिबाचे भोग म्हणायचे, स्वतःला सुख लागण्यासाठी, फक्त त्याच्या घरात राहता यावे जे पूर्णपणे मीच उभे करून दिले, आगदी सगळ्या सामानापासून तरीही तिथे मी परकी की अधिकार दाखवायला जाऊन मुलाचे सुख बिघडवू . काहीच समजत नाही, मी मुकाटययानी त्याच्याशी सगळे काही सोडून दिले आज ठरवते आहे जोपर्यंत तो इथे भारतात आहे तोपर्यंत साई साठी जायचे आपले आपण भेटायचे , तिला बाहेर घेऊन जायचे वाटले तर तिथेच खेळायचे बाकी कोणाशीच काहीही बोलायचे नाही न माघारी फिरायचे. पाहू यात एवडे तरी मिळते कि तिथेही आणखी काही वाट्याला येते ते? कालाय तस्मेयेन  माः .

No comments:

Post a Comment