Friday, December 31, 2010

१/१/11

आज नविन वर्ष, स्वताःच स्वताःला शुभेच्छा घ्याव्यात, कारण आपणच आपणासाठी काही तरी प्रोब्लेम निर्माण करत आसतो॰ नविन वर्षात काय काय सामोरे येणार काय माहित? पण म्हणुनच वाटचाल करायला बारे वाटते, उद्या काय होणार हे जर आज कळले तर जगण्यातला उत्सहच निघून जाईल रोज काही तरी नविन वाट्याला येते म्हणून आपण आयुष्य नाव्यनी जगतो न? कही तरी वेगले आयुष्यात घडत राहते, न ते खरेच गरजेचे आहे॰
मी के करावे हे मझ्या हातात आसते तर प्रतेक जण स्वतःला हवे तेच घडवून घेउन जगला आसता, नको ते केव्हाच सोडून नुसते त्याला हवे तसे आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला आसता॰ आज तसे नहीं म्हणून माणूस माणूस म्हणून कुठे तरी सापडतो आहे॰ नसता मणसातला राक्षस पदोपदी दिसला आसता॰, अत्ता सारे कंट्रोल त्या परमेश्वराच्या हातात आहेत म्हणून माणूस जागेवर दिसतो आहे॰ जाऊ देत नविन वर्षात त्या नियन्त्याची आठवण ठेवणे न येइल त्याला सामोरे जाणे या शिवाय माझ्या पुढे कही पर्याय नाही॰ बस आता वाट पहायची ती शेवटची, त्याची मात्र आता ओढ़ लागली आहे, या वर्षात तरी पर्मेश्वराकडे हेच मागणे आसेल की या सगळ्यातून आता सोडव.

Monday, December 20, 2010

२१/१२/2010

आज लगेच सापडला ब्लॉग, रोज उघडायला हवा तो न कही तरी लिहित गेले पाहिजे॰ काय लिहायचे हे आज काही ठरवले नहीं, तसे आपण ठरवलेले काही घडते का? ठरवावे न तिथे कही तरी आडचण यावी हे तर नक्की ठरलेले॰ तसे आता सगळे रूटीन बसले आहे, रोज घरी जाते, जेवते, पुस्तक वाचते, झोपते पुन्हा उठते, लोकल पकड़ते, ऑफिस ला येते, त्यात कही बदल नहीं होत आहे, याचाही कन्टाळा येतो, खरे तर आता नोकरी करण्याचाच कन्टाळा आला आहे पण काय करू घरी बसून, वेळ जायला तरी हवा न? नसता आणखिंनच मोकळा वेळ मग जास्तच निराश होत जाईन पाहते आहे, कही सापडले की नोकरी पण सोडून देइन आता कुणासाठी कही करायचे म्हणून नाही आड़कनर॰ पाहू यात परमेश्वराच्या मानत काय आहे ते, त्याच्या वर सारे सोपवावे न गप्प रहावे असे आज तरी वाटते आहे.

Tuesday, September 28, 2010

२९/९/10

खरे तर आज लिहिन असे नव्हते ठरवले पण वेळ मिळाला न मुख्य म्हणजे लिहावेसे वाटले काल सहज "लागा चुनरी मैं दाग" हे गाणे आठवले न आज सकाळी ते रेडिओ वर लागले इतका आनंद झाला कारण ते गाणे ऐकावे असे वाटत आसताना गाणे ऐकायला मिळणे म्हणजे आपण इच्छा करणे न लगेच ती गोष्ट आपल्याला मिळाली की खूप बरे वाटते॰ खरे तर आयुषाची ५० वर्ष संपली आता पण तरीही लहान मुलान प्रमाणे आनंद हा होतच आसतो कुठे तरी त्या भावना मनामध्ये आसतात॰ असे बरेच वेळा घडते की अखाद्याची आपण आठवण काढत आसतो न ती व्यक्ति भेटते तरी नसता त्या व्यक्तीचा फ़ोन येतो हे का घडते याला उत्तर नहीं पण मनाच्या गाभ्या पासून एखादी गोष्ट आपण कधी मागितली तर ती मिळते पण त्या साठी हेतू चांगला पाहिजे॰ हा आनुभव बरेच जाणांना येत आसेल हे निश्चित॰ मी पण हे खुपदा आनुभवते, न मग असे कुठेतरी ते सांगितले पण जाते॰ चला आज बस आता कमला लगावे कसे.

Sunday, September 26, 2010

२७/९/10

काल सगळंयाना दिवाळीसाठी बोलिवण्यासठी पत्र लिहिली खूप दिवसानी अशी पत्र लिहिण्याचा योग आला नसता जे कही बोलणे ते फ़ोन वरून होते मग ती लिहिण्याची मजा नहीं चाखता येत॰ असे घडले त्यामुळे माणसे जवळ अली की लाम्ब गेली हे नहीं सांगता येणार॰ फ़ोन वर आपण आगदी मनातले कधी बोलतो का? का? कशी? असे प्रश्न विचारले जातात पण मनाच्या गभ्यातुन आलेली साद त्या पत्रातच मिळते असे माला वाटते हा॰ शेवटी हा ज्याच्या त्याच्या भावनांचा प्रश्न आहे॰ मला आवडलेली गोष्ट दुस्र्याला आवडेलच असे नहीं॰ तर पत्रा वरून aathvale की माणसे संवाद sadhtana फ़ोन मुळे जवळ अली की लाम्ब गेली फ़ोन mule लगेच त्या क्षणाला साद घालता येते न त्याला प्रतिसाद पण लगेच मिळतो तरीही पत्र लिहिताना मनानी दिलेला आपुलकीचा mulama त्या पत्रातून जाणवतो। फोन आला न माणूस लिहिण्याचे कष्ट घेईना झाला॰ आज काही लिहिता नहीं येणार असे वाटते आहे शब्द lavkar nahit umtat ahet computer वर किती या गोष्टींच्या आधीन होतो न आपण। चालायचेच आज बस आता.

Monday, September 20, 2010

२१/९/2010

बरेच दिवसाने लिहिते आहे , लिहिण्य सारखे खूप कही आहे पण वेळ नहीं होत लिहायचे तर॰ संध्याकाळी रोज कही तरी नविन घडते न लोकल नहीं मिळत कही तरी कारण आसते, अचानक काही काम निघते न बस साठी नहीं जाता येत, बस मिळाली तर गर्दी मध्ये आडकते, नसता बस थांबत नाही काही तरी घडते न लोकल च प्रश्न निर्माण होतो आहे, काल सगळे निट होते तर लोकल ला तूफान गर्दी की चढताना मारामारी न उतरताना पण यालाच आयुष म्हणायचे का? आपण कही तरी ठरवतो न घडते दुसरेच काही॰ पण आता या सगळ्याचा कंटाळा आला आहे किती पळापाळी करायची न यातून कही साधले जाते का? अत्ता पर्यंत मुलान साठीच धावत राहिले आजही त्याना गरज आहे म्हणून नोकरी करते का? की मलाही घरा बहर रहता येते त्यामुळे, कही असू देत पण धावपळ ही करावी लगते न, त्याचा आता कंटाळा येत आहे॰ जरा निवांत आयुष्य आसवे असे वाटते आहे पाहू काही करता येते का ते?

Tuesday, September 14, 2010

१५/९/10

रोज तारीख लिहिताना पाहते की आर्धी मराठीत न आर्धी इंग्रजी मधे येते ती दुरुस्त करायची ठरवते पण तसेच राहून जाते॰ आयुष्यात पण आसेच आसते की खूप गोष्टी जशा आहेत तशा समजताता मग त्या दुरुस्त न करताच तशाच चालवून घेत्यला जातात त्याची सवय होउन जाते म्हणा न! आयुष्यात त्या चुकीच्या आहेत हे लक्षात येउन देखील आपण त्या नहीं दुरुस्त करत आसे वाटते की करू नंतर न तसेच राहाते खुप लहनपणापसून माला माहित आहे की "अंथरुण" हा शब्द पण आम्हा सगळयानाच तो हनत्रूण आसा म्हणायची सवय ती लागली ती लागलीच मी लग्न झाल्या नंतर प्रयत्नाने ती बदलली पण अनवधानाने कधी तरी ते हनत्रूण होते अपोआप॰ आसे किती तरी प्रसंग सुध्या आस्तील की ते तेव्हा चुकीचे घडले पण ते ते तसे बरोबर म्हणून मनावर ठसाले न मग ते प्रसंगाना तसेच सामोरे गेले जाते कोणी तरी दाखवून दिले तरच ते चुकीचे म्हणून लक्षात येते नसता ते इतराना देखिल खटकण्या सारखे नसते॰ आज काल लिहिणे देखिल आसेच होते आपोआप कही चुकत आसेल तर कोणी दाखवून दिले तरच लक्षात येईल पण हे वाचणार कोण न माला सांगणार कोण?

Thursday, August 26, 2010

२७/८/10

काल लिहिले न एडिट करण्या आधीच पाठवले गेले जाऊ देत तसे कही विशेष लिहिले नव्हते पण... आज परागला फोन केला पण त्याना कोणाला कशाचा सिरियस पणा जाणवत नाही॰ का वागते माई आशी का नहीं ती गोष्टी समजून घेत कोणी मुद्दाम तिला बाजूला टाकते का? आम्ही जेव्हा कधी जमेल तशी एकमेकांशी धरून राहतो न! का नहीं तिला असे कोणाला तरी धरून रहायला जमत॰ मी आता वालचंद नगर ला जायचे म्हणते पण बाकी किती ओढ़ाताण होईल याचा विचार ती करते का? ती रिकामी आहे म्हणून दुसर्याच्या आड़चणी तिने समजून घेऊ नयेत का? मी मझा वैताग आज इथे लिहित आहे॰ पण तो कुणाला सांगणार न? मग असे स्वताःचे मन मोकळे करायचे जगात तर पुन्हा सारे विसरून नॉर्मल आयुष जगायचे असते न? तिला ह्या गोष्टी समजत नाही का? आता तिची देखिल पन्नाशी उलटली ती का अशी वागते? का आपले लाड़ पुरवले जातात म्हणून माझ्या सारखे माझा कोणी विचार करणारेच नसते तर ती नॉर्मल वागली आसती का? कोणी माझे लाड्कोड पुर्विणारे भेटले आसते तर मी ही अशी झाले आसते का? का की हा ज्याचा त्याचा स्वभावच आसतो, काही समजत नाही॰ डोके भणभणायला मात्र लगते॰ जाऊ देत सरे इथेच सोडावे न आपल्या उद्योगाला लगावे.

Wednesday, August 25, 2010

२६/८/10

आज लिहिताना नक्की काy लिहावे विचार एक विषयावर नहीं थाम्बत आहेत.सकाळी सकाळी खुप सुन्द्दर मेल वाचला खुप चांगले वाटले कूप कही लिहिले होते पण त्यातले एक खुप अवदले, बदल बदलल्याने आयुष बदलत नहीं तर बदल स्विकर्ल्याने आयुष बदलते आगदी खरे आहे जी परिस्थिति आहे टी स्वीकारुन आयुशत वाटचाल केलि तर टी जास्त सोपे जाते.तसे बदल सतत आपल्या न काळात पण हॉट आसतात आपण तय जुन्य विचारानाच चिकटून राहिलो तर आयुष्य तिथेच थम्बेल न कोणतीही थम्ब्लेली गोष्ट संपली टी ख़राब ज़लीच म्हणून समजा। त्यासाठी बदल स्वीकारुन ते आच्र्नत आनले पाहिजेत हे निश्चित.

Saturday, August 21, 2010

२२/८/10

आज घरी कंप्यूटर वर लिहिते आहे॰ रोज ऑफिस मधे मिळतिल त्या १०-१५ मिनिटात लिहायची पण आज ही कही फार लिहू शकेन असे नाही.कारण कामे वाट पाहत आहेत, आजुन कचरा काढून पण झालेला नाही, तरीही बसले नेट वर । काल तर खुप कही लिहायचे ठरवत होते। मी "विजयनगर" पुस्तक वाचते आहे माहित नसलेला इतिहास पण किती तरी नवे लहानपणी इतिहासात वाचली ती नावे सापडली की अरे हे तर आपल्याला माहित होते पुस्तक चांगलेच आहे.पण ते लिहिण्याचा कही विचार नव्हता पण असेच होते जे लिहायचे ते भलती कडेच जाते न दुसरेच कही तरी लिहून जातो आपण पण आज लक्षात राहिल कारण मला माझा ब्लॉग शोधता आला न त्यावर कही तरी लिहिता आले॰ खुप धोबल पणानी मी सरे पहात जाते जमेल तसे लिहित जाते, आर्थात कोणी वाचावे ही माझी आपेक्षाच नाही आहे मी लिहिते आहे ते मज्यासठी "only mine & for myself" बस आज इतकेच.

Friday, August 20, 2010

२०/८/10

आज सकाळी सकाळी कम चालू होते रोजच्या सारखे गाणी चालू होती न खूप ओळखीचे म्युजिक लागले पण गाणे आठवेना हातातले काम थांबले इतके ते गाणे ओळखीचे होते गाणे सुरु झाले ते आभिमान मधले "अरे मित ना मिला रे मन का" माझ्या सगळ्यात आवडीचे आभिमान मधली सगळीच गाणी चांगली आहेत पण मला सगळ्यात आवडते ते हे गाणे॰ आनंद न आभिमान हे दोन्ही सिनेमा बघायला जायचे म्हणून भांडून गेलेले, तेव्हा सिनेमा आसा घरापर्यंत पोह्चलेला नव्हता॰ आनंद पाहिला पण आभिमान बघण्यासाठी खूप वाट पाहावी लागली॰ सिनेमातील हीरो न हिरोइन बघून नव्हता सिनेमा पहात तर गाणी ऐकून ते पहायचे ठरविले होते॰ आनंद मधील "जिन्दगी कैसी है पहेली" हे गाणे ऐकून तो सिनेमा बघायचे ठरविले होते॰ आज ते गाणे ऐकले न ते दिवस पुन्हा आठवले, सारे काम सोडून ते गाणे पुन्हा बघितले असे वेड आसलेले दिवस कधी मागे पडले ते समजलेच नाही॰ रोजच्या धकाधाकित आपल्या आवडी पण विसरून जातो न आपण॰.जाऊ देत पुन्हा जुन्य गोष्टी आठवल्या की बरे वाटले दूसरी गोष्ट म्हणजे आज बस मधून उतरले न पोत्राज समाजाच्या २ बायका ढोलके घेउन न सोबत २ लहान मुले पोत्राजच्या वेशात लहान लहान चाबुक त्यांच्या हातात होते उद्या ते सुद्या अंगावर चाबुक मारून घेणार, हेच शिक्षण त्याना दिले जाणार न त्याच रत्यावर २ मुले घेउन २ बायका शाळेत सोडण्यासाठी निघाल्या होत्या किती तफावत होती दोन्ही शिक्षणत दोन्ही आई मुलाना शिक्षण देण्यासाठी तयार करत होत्या पण ...हा पण सापडेल का? माझ्या मानत हा विचार येतो त्या मुलीला वाटत नसेल का की आपल्या मुलाने शाळेत जावे कही तरी शिकवे न मोठे व्हावे मला माहित आहे याचे उत्तर माज्याकडे nahi, कोणाकडेच नहीं.

Tuesday, August 17, 2010

१८/८/10

काल मई च फोन आला न तशी मी disturb झाले, काय केले म्हणजे तिचे विचार बदलतील॰ का तिचा स्वाभाव असा बनला असेल॰ आयुष्यात चढ़ उतार तर प्रतेकाच्या वाट्याला येतात पण दर वेळी आकंड तांडव करून काय पदरात पड़ते॰ कोणी कोणाचे नशीब तर नहीं बदलू शकत ती हा विचार का नहीं करत॰ मी म्हटले म्हणून कही तिच्या मुलाला चांगली नोकरी मिळेल का? मी म्हणाले म्हणून चांगली बायको मिळू शकते का? जे ज्याच्या वाट्याला येणार ते त्याच्या वाट्याला येणार न ते भोगूनच आयुष्य पर करावे लगते हे कसे समजावयचे तिला जाणार आहे वलचंनगर ला पाहू यात कही बदल होतात का?
खुप विचार करते , असे ती का वागत असेल, का नहीं ती दुसर्या बाजूने विचार करायला शिकत॰ आयुष्यात त्यामुळे किती मोठा फरक पडतो, आपल्या बरोबर दुसर्यांचे पण आयुष्य सुखावह होते न, जाऊ देत जास्त विचार नहीं करायचा या गोष्टीचा जे कही घडेल ते तिच्या नशिबाने घडेल॰ आपण फ़क्त प्रयत्न करायचा.

Monday, August 9, 2010

१०/८/10

आजकल मी खडकीला उतरून बस ने विश्रन्तवाङी ला येते काल खडकी स्टेशन वरून रास्ता क़ॅस करत होते कुठल्या धुंदीत होते माहित नहीं पूर्ण रास्ता पार केला पण शेवटी असे वाटले की येणारा गाड़ीवाला माझ्या मागून गाड़ी घेउन जाईल पण तो थेट अंगावरच आला की, सगळे ओरडले रस्त्या वरचे। कसे न किती गोष्टी आपण गृहीत धरतो न? हे असे गृहीत धर्णेच खुप वेळा चुकीचे ठरते त्यापेक्षा स्पष्टपणे काही गोष्टी बोलल्या किंवा एकमेकाना सांगितल्या तर जास्त चांगले होत असेल असे वाटते॰ रोजच्या आयुषात आपण आपल्या बरोबर काम करणारी मणसे आसोत वा सोबत राहणारी न बोलता तुम्ही आसे कराल असे वाटले होते असे सहजपणानी म्हणून जातो पण खुप वेळा या गोष्टी चुकीच्या निघू शकतात॰ नवरा बायको , आई वडिल , बहिण भाऊ, मित्र असे किती तरी जण असतात की न बोलता त्यांच्या कडून अपेक्षा मात्र करत आसतो, पण हेच जर तोंडाने बोलून सांगितले तर किती तरी समज गैरसमज कमी होतील न॰ आज इतकेच बस.

Sunday, August 8, 2010

९/८/2010

आज मझाच ब्लॉग मी वाचत होते,छान वाटले वाचताना.त्या घटकेला काय काय लिहून जातो न आपण.पुन्हा आठवायचे म्हटले तरी आठवत नहीं.लोड केलेला फोटो पण चांगला वाटतो आहे पहाताना नंतर नंत्तर एडिट करायला पण जमायला लागले, ठीक आहे जे मला म्हणायचे आसते तेच लिहिताना लिहिले गेले मग बारे वाटले
मी आता नितिन कड़े म्हणजे माझ्या धाकट्या मुलाकडे रहण्यासठी आले आहे हे बदल तर होणार आहेतच ते स्विकरुनच पुढे जावे लागेल.पण सामान ने आण करताना दमायला होते आहे, पूर्वी सारखा उत्साह नहीं वाटत का ते नहीं माहित पण वय झाले म्हणून ही असेल पण आजकाल लवकर दमते मी.आजही ऑफिस ला यायचे जिवावर आले होते, तसे इथे कम फार नहीं पण लगेच tention येते ते नहीं आले पाहिजे.tention माणसाला निम्मे बर्बाद करते म्हाणायला हरकत नहीं हे समजते बरका पण कोण काय म्हणेल मी कशी वागले म्हणजे दुसरे कोणी दुखावले जाणार नहीं हाच विचार करत बसते म्हणून कदाचित थकत असेन पण वय हा ही १ फॅक्टेर नक्कीच आहे। आता त्या प्रमाणे जरा वागायला पाहिजे हे नक्की उगाच सगळी जबाबदारी आपली हे डोक्यातून काढून टाकले पाहिजे.पाहू यात जमते का ते.नितिन तसे मझ्यासठी खुप करतो, सचीनपण मला काय हवे नको पाहतो पण तो जरा सड़ेतोड़ असल्यामुळे असेल जरा खाटकातच रहते माला कही तरी जाऊ देत सगळ्याकडे दुर्लक्ष करणे हे जास्त सोयीस्कर॰

Friday, July 23, 2010

२४/७/2010

किती वेळ लागला ब्लॉग शोधयलाच.सम्पर्कच नव्हता जवळपास महिनाभर मी आमरनाथ सहल करून आले १५ दिवस कुठेच काहीच संपर्क नव्हता। योगायोगाने फ़ोन पण बंद होता , तशी निवांत होते आमरनाथ , बर्फाचे लिंग वर्षभ्र्रात फ़क्त १ महिना ते लोकाना दिसते, बाकी ११ महीने ते बर्फातच बंद आसते तिथे पोह्चणे सुध्दा शाक्य होत नहीं। उंची जवाल्पस १३४०० फूट रस्ता सगळा डोंगराचा न ते ही पांढ़य्रा मातीचे जागोजागी कड़े धसळणारे.२ डोंगर चढ़ायचा न तितकेच उतरायचे त्यानंतेर ती प्रसिध्द गुहा जिथे ते लिंग तयार होते ते आहे मात्र अप्रतिम स्फाटीकासारखे नितळ कसे काय तयार होते ते एक आजबच म्हणायचे। पण तिथे जाताना अक्षरशः आईचे दूध आठवते। रास्ता सगळा जाताना चढाचा। पहिला डोंगर ११००० फूट .तो चढ़ायचा न पुन्हा उत्रायचा त्या नंतेर २ रा डोंगर तो संगम पर्यंत घेउन जाणारा। तिथे सगळा बर्फ न चढ़ असा की सरळ एक रेषेत.गर्दी तर इतकी की एकला लागुन एक चालत होते। वाटेत बर्फ न पाणी त्यामुळे पांढ़य्रा मातीचा चिखल झालेला सगळा। आवघ्या १८ कि.मीला पूर्ण ९ ते १० तस लागलेले.पुढे बर्फाच्या नदितुंनच चालने न मग गुहेच्या दारात जाण्यासाठी पायर्या तिथे ४ ते ४.३० तस लाइन मधे .त्या नन्तेर दर्शन झाले पण त्यामुळे सारा शिण संपला अप्रतिम असे ते ८ तस १० फूट लिंग पाहिले न देह भानच विसरून गेले त्याचे फोटो टाकायला हवे पण मला ते जमात नहीं पहु कोणाला तरी विचारून ते ही पठ्विन

Sunday, June 27, 2010

२८/६/2010

आज सकाळी सकाळी खुप घाई झाली, सचिन चा फ़ोन आला न बोलता बोलता वेळ कसा संपला ते कळलेच नाही। चालायचेच। काल खुप टेंशन होते॰ , नितिन पण मृणाल वर चिडलेला न सचिन ने पण राजीनामा द्यायचा निर्णय घेतलेला। पण कालच किशोरशी बोलले न रीलाक्स झाले होते.मृणाल रविवारी येते आहे, न सचिन थाबंतो आहे थोड़े दिवस.चला काय होइल ते पाहण्या शिवाय माझ्या हातात काय आहे.मुले मोठी झाली त्यांचे ते निर्णय घेऊ लागली १ प्रकारे समाधान आहे पण आता मुलाना आपली गरज नहीं हे ही कुठे तरी मानत येते पण माला खरच नाही वाइट वाटत या गोष्टीचे। ते तेवढे सक्षम झाले म्हणजे मी निवांत झाले न? असे तर होणारच त्यांचा संसार चालू झाला की तेच निर्णय घेणार न, उलट त्यानीच निर्णय घेणे महत्वाचे आहे.जरा शांत पणे विचार केला की हे सरे पटायला लगते। मी आता बाजूला होणे च योग्य आहे.बस आज बस करते.

Wednesday, June 2, 2010

३/६/10

किती दिवसानी लिहिते आहे आज पण वेळ होत नहीं न जेव्हा वेळ आसतो तेव्हा लिहायला जमात नहीं आजही कही लिहायला लगे पर्यंत कोणी तरी येइल न लिहिणे तसेच राहिल असे होते बरेच वेळा आयुष्यात खुप वेळा आसा आनुभव येत आसतो की आपण ठरवतो काही न होते काही.काही का आसेना २ वाक्य तरी लिहायची ठरवूनही नाही जमले लिहायला अर्थात त्यालाही आपणच कारण आसतो, आगदी मनापासून ठरवले तर नक्की हे जमले आसते आपला आळशीपणा नडतो म्हणा न आसे किती तरी प्रसंग आसतात की आपण ठरवले आसते तर नक्की जमले आसते.पण त्या गोष्टीची तेव्हढ़ी निकड नहीं भासत माणसाला ज्याची निकड भासते ते माणूस जिव तोडून करतोच करतो हे लिहिणे पण तसे आहे त्या वाचून तसे कही बिघडत नाही हा जरा मनाला आस्वस्थ वाटते पण असे अस्वस्थपणा मनाआड़ टाकायची सवय झाली आहे। आली वेळ सपादुन न्यायची न चालायला लागायचे.पण आता बस फार वेळ नहीं चालणार हे, कुठे तरी आपल्या मनचा विचार करून त्या प्रमाणे चालायला पाहिजे.

Thursday, May 20, 2010

२१/५/10

आज सकाळी सकाळी नितिन ने टी व्ही लावला, आनंद सिनेमा लागला होता, त्याने तो तासाचा चालू ठेवला.मला आनंद सिनेमा आवडतो हे त्याला माहित आहे.किती वर्ष झाली मी तो पाहत आले आहे.मी ११ वि ला होते तेव्हा खास सिनेमा बघण्यासाठी म्हणून गेलेले होते, सोलापूरला ते दिवस असेच कुठे तरी गुन्तण्याचे होते.३५ वर्ष झाली पण आजुनही त्या सिनेमातली गोडी कमी झालेली नाही, तसे त्यातले संवाद तेव्हाही पाठ होते आताही न बघता ते आठवतात, पण त्याचा कन्टाळा नाही येत। मास्टर पिस म्हणतो तसा आहे तो .खरेच असे आयुष्य कोणी तरी नक्की जगले आसेल.आयुषाची आवघी काही महीने राहिलेले न हसतमुख आपला काहीही संबध नसलेल्या लोकात त्यानाच्यासथी न त्यांच्या बरोबर जगायचे खरेच परीक्षा आहे टी। पण रोजचे आयुष्य आस्ते असेच लम्ब्लाचक तर इतक्य उत्कात्तेने जगु शक्ल आस्ता का? माला हा नेहमी पद्नारा प्रश्न आहे। घर उभे करायचे न तय घरातील मांसना उभे करण्यासाठी धड्पदय्चे असे वाट्याला आले आस्ते तर आनंद इतका हसतमुख रहू शक्ल आस्ता। उद्याची कलजी त्याला नवति म्हणून तो इतका आंदी न हसत रहू शक्ल.आपण पण असे उद्याची कलजी सोडून जगु शकू का? खुप वेला प्रयत्न करते पण टी सवय लागली की आस्लेल्यातिल चिमुटभर उद्यासाठी किव दुसर्यासाठी काढून ठेवायचे मग उदय जर विसरता येत नहीं तर ते आयुष जगता येइल का? पण आत्ता टी गरज आहे, सगळी चिंता सिडून आत्ताचा शकन जगण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे.पहु जमेल का ते.

Sunday, April 11, 2010

१२/४/10

फोटो उपलोड करायचा प्रयत्न करत होते पण नहीं जमात आहे, आता मेधालाच विचारेन महिला दिन निमित्त्य मी काय बोलले ते विचारत होती ऑफिस मधे महिला दिन निमित्त्य कार्यक्रम होता, सगळ्या बयकानाच बोलावले होते विषय होता, मी न माझे कार्यालय, मी न माझे कुटुम्बा, मी न माझे आरोग्य। बोलणारी प्रतेकजण महिला दिन निमित्य शुभेच्छा देत होत्या , का आपणच आपल्याला शुभेच्छा घ्यायच्या? माझा पहिला दावा हा होता, जे कही आम्ही बोलणार ते ऐकायला कोणी पुरुष नकोत? माझे कार्यालय बाबत मी बोलले पण मी तर पूर्णपणे field duty केली, मला कार्यालय आसे नव्हतेच ते सांगितले, की बाहेर बरोबरीने काम करणारे पुरुषच विश्वास ठेउन साथ देतात न? बाकी समजापसून कही त्रास होऊ नये म्हणून ते सोबत करतात न? तसेच रोजच्या जीवनात सुध्या आपल्याला सुटका हावी आसते ती पुरुषांपसून नहीं तर पुरुषीपणाच्या दृष्टिकोना पासून.तो बदलला की खुप गोष्टी बदलतात, शेवटी एकमेकाना सोबत तर हावी आसतेच मग समजून घेउन जर ती सोबत केली तर आयुष्य जास्त सुखाचे होते। आपल्याकडे, आर्ध नट नारेश्वरी ही एक कल्पना आहे ती प्रतेकासठी लागू होणारी आहे, कारण त्याशिवाय एकमेकाना पूर्णत्व नाहीच आहे। आपल्याला बायकांचा सुध्या दृष्टिकोण बदलला पाहिजे, रोजच्या चाकोरीतून न जाता एखादी जरा हटके जात आसेल तर एकदम तिला वाइट नहीं ठरवले पाहिजे.या देवी सर्व भूतेशु आशी एक प्रार्थना आपल्याकडे आहे, त्यात सर्व देविना आवाहन केलेले आहे, धन देवता, भूदेवी, विद्या देवी शक्ति , भक्ति .त्यात एक देवी ठेवायची,manegment ची देवी, जे कम स्त्री वर्षानु वर्ष करत आलेली आहे, त्यामुळे समाज स्थीर आहे, मुले बाळे व्यवस्थीत राहतात, घराचे घरपण टिकून राहते, स्त्री घराबाहेर पडली पण तिने तिची मनेजमेंट नहीं सोडली, ती घराबरोबर ऑफिस च ही कारभार पाहू लागली। स्त्री विचरने बदलली पाहिजे तरच सरे बदलू शकते। खरे तर महिला दिन हा वेगळा साजरा करण्याची गरजच नहीं भासली पाहिजे। ती समजबरोबर समरसून गेली की त्याना वेगळेपण देण्याची काय गरज? ती म्हणजे सुख मिलण्याचे साधन ही संकल्पनाच बदलली पाहिजे। आसे कही बही बोलले सोमोरच्या बयकाना ते पटले आसवे कदाचित म्हणून फोटो न सरे सोपस्कार झाले आसवेत.

Thursday, April 8, 2010

९/४/10

आरोग्य पत्रिकेत महिला दिन निमित्त्य भाषण करतानाचा फोटो आला सगळीकडे कौतुक झाले, अंक घरी नेला पण घरात नहीं दखावणे झाले कोणी तो अंक ऊघडून नहीं बघणार माला माहित आहे तेवढ़ा इंटेरेस्ट कोणालाच नसणार आहे॰ भाषण छान झाले होते हे माला माहित आहे पण त्या गोष्टींचा रोजच्या जीवनात कही फायदा आसतो का? किती तरी गोष्टी, ऊस्फुर्त पणे घडतात, पण आसा चान्स किती वेळा मिळतो, सरकारी नोकरी इथे कशाला कही वाव नहीं, न मग डोके पण कम करेनसे होते। अता या नोकरीचा पण कंटाळा यायला लागला आहे॰ पण आणखी ५ वर्षे करणे भाग आहे॰ पाहू यात कसे कसे जमते ते॰ वेळ सम्भाळायची, बस जबाबदारी आहे म्हणून काम करायचे॰ मानसिक समाधान या नोकरीत कधीच नहीं वाट्याला आले॰ माला माहित आहे की या नोकरी मुळे मी न मुले निटपणे रहू शकलो, मुले शिकू शकली तरीही हे समाधान नहीं ते नाहीच बस पाट्या टाकणे चालू आसते माझे, आले ते काम करायचे दिवसाचे ८ तस पूर्ण झाले की आजचा दिवस संपला म्हणायचे न बाजूला सरकायचे॰ आता आयुषात पण आसेच आहे, जबाबदारी संपली, आपली कोणाला गरज नहीं राहिली, माझी मुले मझ्याशी नाहीत तशी वागत पण माझ्या मनातून या गोष्टी जात नाहीत, कदाचित जोड़ीदार आसता तर हे इतके नसते जाणवले, पण आसे वाटते की आयुष्यातली ५२ वर्षा संपली पुढची संपतील का? असे विचार सुरु झाले की मन अस्वस्थ होते, कही तरी चुकाते आहे असे वाटत रहते, जोड़ीदार नसणे हा माझा आपराध नहीं पण त्यामुळे येणारे वैफल्य नहीं न संपत॰ तरी या विचारांकडे नहीं मी मनाला जाऊ देत, तरीही कधीतरी तो विषय डोक्यात येतोच, आजही तसेच आहे मनाला सावरले पाहिजे यावर दूसरा कही इलाज नहीं ,बस आज इतकेच.

Tuesday, April 6, 2010

७/४/10

आज सकाळी चालत येताना दोन लहान मुले एकमेकाच्या गळ्यात गळा घालून रस्त्याने जात होते मस्त त्यांच्या त्यांच्या विश्वात रममाण झालेले कशाकडे लक्ष नव्हते मला माझे लहानपण आठवले, किती मस्त काळ आसतो न तो, मैत्रिणीशी भंआड़ायाचे तरी सकाळ झाली की तिची आठवण येणारच, मग कही तरी कारण काढून तिच्याकडे जयाचे, ती ही आपल्या सारखीच आस्वस्थ झालेली आसयची एक्मेकीना पाहिले की कालचे भांडण विसरले जायचे न एक्मेकीची ओढ़ जास्त जाणवायची ते दिवस वेग्ळेच होते, आभ्यासाचे बर्डन नव्हते, बस पास होताहेत न मुले आसे म्हटले जायचे। खेळायसाठी घराला आंगन आसायचे न आई वडीलाना कही बोलायचे आसले की आमची रवानगी अज्जाद त्या आंगणात खेळायला व्हायची मी तर सगळे खेळ खेळायची आगदी गोट्या, आंब्याच्या कोई, चोर पोलिस, डबा येसपैस, कसा वेळ संपायचा हे समजायचे नहीं माझ्या आयुषात मी आभ्यासा साठी कधी नहीं मर खाल्ला पण खेळून घरी ऊशीरा आले म्हणून खुपदा शिक्षा भोगली आहे.आज त्या दोन मुलाना पाहिले न ते दिवस आठवले, कही काळ का होईना सरे टेंशन विसरून त्या क्षणात जाऊन पोहचले.त्यानंतर खुप जबाबदार्या कदाचित आयुषात येणार आसतील म्हणून तो तसा बिनधास्त काळ वाट्याला आला असावा.

७/४/१०

Sunday, April 4, 2010

५/४/10

कही वेळा खूप लिहायचे आसते पण लिहायला जमत नहीं, वेळ नसतो, कधी कम्पूटर काम करत नहीं आजच लिहित होते न एकदम एरर आली पाना वर धोंडोपंत कसे के लिहितात ,तसेच सरदेसाई पण माला कधी वेळ नहीं जमत, मूड आसतो तेव्हा नहीं लिहिले की नंतर नाहीच सुचत कही, पण anyhow मी लिहायचा प्रयत्न तरी करते आहे।
लग्नाची गोष्ट झाली काल आसे भातुकलीच्या खेळाताले लग्न झाले न तेव्हा पासून जी जबाबदारी आली ती आजपर्यंत निभावते आहे॰ love marriage त्यामुळे माहेरी कोणी बोलावणार नव्हते, दीपवली आली न ससुर्वाड़ी कडून बोलवाने येणार का? म्हणून चिडूवून ही घेतले॰ पण ते शाक्य नव्हते दीवाली च दिवस ऊजडला, सकाळी सकाळी पाणी गरम करायला ठेवले होते, न हॉस्पिटल मधून खरेच बोलावणे आले दोघेही गेलो, हॉस्पिटल मधून बोलावणे म्हणजे, कही तरी गंभीर नक्कीच होते, गेलो तर दोघी मायलेकी lepra reaction साठी अडमिट होत्या आई जरा serious होती, न नेमका दिवालीचा दिवस तिचा शेवटचा ठरला होता॰ lepra reaction नेच मुलगी पण दाखल झालेली आम्ही तापसले, नाड़ी लगत नव्हतीच पण आम्ही technician न आम्हाला रुग्ण मेला असे नहीं म्हणता येत, बाकी सगले सोपस्कार चालू झाले, ती मुलगी, तिच्या लक्षात आले की आपली आई नहीं राहिली या जगत, ती जी धावत आली ती थेट गळ्यात पडली कही बोलायला सांगायला वाव नव्हताच तिची कशी बाशी समजूत घातली पण आक्खी दीवाली ऊदास ऊदास गेली, कायम लक्षात राहिलेली ती दीवाली, दिवाळसणासाठी बोलावण्याची वाट पाहत होतो, पण त्या दीवाली ने माणसाची पराधीनता प्रकर्षाने जाणून दिली॰ चालायचेच,यालाच जीवन आसे महानत आसवेत.

५/४/10

माझ्या लग्नाची गोष्ट

तसे लग्न म्हटले की नविन साडी, सजलेल्या बायका, शेहनाई, धावपळ, जेवणाचा एक खास वास. माझ्या लग्नात आसे काहीच नव्हते। धावपळ होती पण ती नवरा नवरीची॰ कारण होस्ट पण आम्हीच, न ऊत्सः मूर्ति पण आम्हीच। लग्नाला जेवणासाठी एकुण २५ माणसे आसतील आशी यादी ठरलेली। दोघांचा मिळून महिन्याचा जमलेला पगार ९००रु न मागची शिल्लक ४०० रु। एकुण १२०० रु॰ लग्न करायचे ठरलेले॰ त्यात ३५० रु मंगलसूत्र १००रु साडी, ५० रु च शर्ट, न मग महिना भारसठी म्हणून भरलेले सामान दबामी करायचा म्हणून रव्याचे लाडू केलेले, भात सम्भार केलेला, न मी पोळ्या लटत बसलेली बाहेर धुल्लाप्पा म्हणून यांचा मित्र त्याची गड़बड़ चाललेली, गोरज मुहुर्तावर लग्न लावायचे ठरलेले। आमचे घर होते बन्दोरवाला लेप्रोसी हॉस्पिटल मधेच दोन खोल्या, नेमके परदेशी पाहुणे आलेले त्या दिवशी त्याना लग्नासाठी दोन तासांची सुट्टी मिळालेली मग मुहुर्त गाठ्ण्यासाठी धडपड.नवर्या मुलीला बोलवा म्हणून आवाज आलेला न माझी तव्यावर शेवटची पोळी चाललेली, ससुबैअना पोळ्या करता येत नव्हत्या। आजुन तोंड धूऊन साड़ी बदलायची होती आवरायचे होते, मेंदी etc.काहीच नव्हते कशी बाशी साड़ी नेसली, सगळे आवरले न आमचे लग्न लागले.त्यानंतर जेवणाची घाई पण जेवान वाढणार कोण? पुन्हा पार्ट बदलला नवरा नवरी वढ़पी झाले .दोन पंक्ति झाल्या न परदेशी पव्हणे ऑफिस ला भेट द्यायला आल्याने नवर्याने वरमाला काढून ठेवलीच होती त्या नविन शर्ट वर एप्रन चढवला न कामाला धवला नवरी बाकीचे पहु लागली, आलेले पव्हणे त्याना या म्हांणणे, जेवायला पांगत मांडणे, जेवायला वाढ़णे चालू होते.माझ्या माहेरची माणसे म्हणजे म्हणजे मामा, मामी, मावशी लग्नाला आले होते पण ते लेप्रोसी हॉस्पिटल न जेवायला फ़क्त माजे दोन मामच बसले त्यानी मामाची आश्तापुत्रा साड़ी आणली होती छान होती साड़ी पण त्यानाही परत जयाचे होते मी तर नवर्याच्या घरी काल पासूनच आले होते न, नो पाठवणी, नो रड़ने माहेरची मानसे आली दोन घास खाऊन निघून गेली। आता त्या होस्पिटलच्या सहेबाचे लग्न न तेहि तिथेच कम करणार्य मैडम बरोबर मग शुभेच्छा देण्यासाठी रांग लागली आनपेक्षित पणे कैतुकाने ते कुष्ठरोगी भेटायला येत होते.न त्यांचे लड़के साहेब त्याना जेवणार का विचारताच ते बिचारे जेवायला बसत होते। १५० रुग्नाचा वार्ड तो, न प्रतेकला साहेब म्हणजे जिव की प्राण.स्वायपक केलेला २५ माणसांचा येणार्याला जेव म्हाणणरा मझा नवरा मोठ्या मनाचा पण आम्हा सासु सुनांची कोण धावपळ सगळ्याना भात आमटी तरी पानात वाढायला पाहिजे न? लग्नाचे लाडू पहिल्या दोन पंक्तित्च संपलेले। धकते दिर, त्यांचा माला न समजणाजरे तमिळ मधे बडबड आसलेले, शेवटी कंटाळून जेवायला बसलेले माझा नवरा येणार्य प्रतेकला जेवायला घालत आसलेला न मी मिहिन्य भरसठी भरलेले रेशन एक दिवसात संपवून मोकळी झालेले कसे बसे रात्रि ९ वाजता सरे ऊरकले.आम्ही कोणालाही आमंत्रण दिलेले नव्हते पण लग्नासाठी स्वयं स्फुर्तिने आलेल्या त्या जिवाना लग्नाचे जेवण देणारा माझा नवरा मोठ्या मनचा पण लगनतली गम्मत वाट्याला आलीच नहीं, घास भरवणे नहीं, ऊखाणा नहीं, बस रांधा, वाढा न ऊष्टि काढ़ा एकदाचे सारे संपले, जरासा श्वास टाकला न पोटातल्या भुकेनी जाणीव दिली सगल्याना जेवायला घालून जे शिल्लक राहिले होते ते घेउन सासुबाई शेजारच्या दादान आई म्हणायचो आम्ही त्यांचाकडे जेवायला गेल्या आम्ही दोघे तसेच घरात शिल्लक कही नव्हते, काही नविन करण्याची तकाद नव्हति कोणाला कही म्हाणता येत नवते, मझा नवरा चुकला होता न, २५ मनसे म्हाणता म्हाणता त्याने २०० मनसे जेवायला घातली होती न मी त्याला साथ दिली होती न? जरा शोधा शोध केल्यावर एक डब्यात कालची भाकरी न भात भरून ठेवलेला daba सापडला, tondi लावायला लोणचे होते बस तो दबा तसाच दोघंमधे ठेवला न आमची लग्नाची पंगत जेवायला बसली माहेरचे कोणी नव्तेच न सासरचे सगले रुसलेले एकमेकाना तोच घास भार्व्ला , आता अशीच साथ दोघाना द्यायची होती पण टी शिली पोली न भात सुधया तय दिवशी खुप गोद वाटला बहुला बहुलिच्या लगनत सुधया बहुला बहुली ला जरा मन आसतो पण इथे सारेच ऊर्फाते होते स्वथाचे स्वता ठरवले होते न सरे दुसर्या दिवशी ऑफिस स्टाफ ला जेवण न रजिस्टर लग्न होते त्याची तयारी आशी नवति सगले होटल मधे ठरवले होते पण आता मामने घेतलेली सदी दूसरा दिवस साजरी करायला होती, तेवा आत्ता सारखे फल पिको पाहिजेच न मचिंग ही पाहिजे आसे नवते टी सदी पन्ध्र्य पोल्क्यावर नेस्ले, न सह्या केल्या। आता मात्र सगले जेवायला होटल मधे गेलो पण असे तट सज्वाने वगारे कही नहीं नोर्मल जेवलो नहीं म्हणायला ऊखाना जाला न एक लग्नाची गोष्ट संपली, ३० वर्षा जाली या घटनेला, पण आजुनही तो स्टोव तो कुकर न दिराची बडबड लोकांची भेटायची घी तशीच आठवते। लग्न तसे ८ वर्षच राहिले, सची (कृष्ण) छे वडिल वरले एक्सिडेंट मधे पण आठवणी तश्याच राहिला, कोणाला सांगितले तर विश्वास नहीं बसणार आशा.

Wednesday, March 31, 2010

१/४/10

आज १ एप्रिल पण दिवस खुप घाई गर्दीचा गेला सकाळी सचीन चा फ़ोन , मग परग्चा कही काम जहाले नहीं.नसला तर मूड मात्र ख़राब झाला खुप कही लिहायचे होते आज पण अत तो मूड नहीं घरी मी एकटी होते तसा कामाचा लोड कधीच नहीं वाटत माला पण बकी गोष्टींचे टेंशन येते.नहीं जमणार लिहायला, रात्री तर काय काय लिहायचे हे नुसते डोक्यात विचार चालू होते पण अत्ता लिहिताना पूर्ण blank असे का होते , विचार एकीकडे न मन दुस्र्या विचारत त्यामुळें कदाचित असे घडत आसवे। पण मनाला न विचराना एकत्र आणताना असेच होणार का? नहीं जमत आज काहीच सुचत नहीं आहे। काल काय लिहिणार हे ठरऊनही पूर्ण कोरी का होते ? चला आज एडिट करताना आपल्याला पाहिजे तो शब्द कसा लिहायचा ते समजले म्हणजे डोके जरा ताळयवर येते आहे म्हणायचे पण तरी आज बस नो मूड .

Monday, March 29, 2010

३०/३/10

ब्लॉग तयार करायला तर शिकले पण तो सजवायला शिकायचे आहे, खुप options आहेत पण निवांतपणे पाहिला पाहिजे खुप कही त्यात टाकता येते फोटो, block कोलोर काय काय करता येते पण निवांतपणे शिकेन सगले। सजवने खरच इतके महत्वाचे आसते का? तसे नुसतेच कोणी वाचणार नहीं का? मी कोणी वाचावे म्हणून नाहीच लिहित आहे पण माला स्वतहाला सुध्धा पाहताना छान वाटेल नक्कीच कोणतीही गोष्ट सजवून समोर अली तर खुप कही सुख देऊन जाते आपण पाहतो न की आई किती कैउतुकाने आपल्या मुलाला सजवते तिला त्या गोष्टीचा कन्ताला नहीं येत उलट वेगलाच आनंद मिलतो.तारुन्न्य आले की स्वताला सजवून जगाला सामोरे जाण्यात नक्कीच सुख आसते, आपल्याकडे कोणीतरी बघावे आसे वाटने म्हणजे तारुण्याची भूल पड़ने आसते .या भूलीतुनच आयुष्यात रामायण घडत आसते।त्यातूनच मने जुलातात प्रेम प्रकरणे घडतात न समोरच्याला bhulvinyasathi स्वतहाला सजवले जाते.प्रेम प्रक्रनत मूड कही वेगलाच आसतो, सगळी दुनिया एका बाजूला न आपले माणूस एका बाजूला.ती धुंदी कही वेगलीच आसते, त्यावेळी सगले जग आपल्यासाठी सजून सामोरे आले आहे आसे वाटत रहते। प्रेमाची पुर्तता लग्नात जाली की समोरच्याला आपल्यामधे aadkivinyasathi पुन्हा स्वताला सजवावे लगते, रोज कही तरी नविन दिसावे म्हणून प्रयत्न चालू राहतो.जन्मापासून सुरु जहालेले सजने चालूच राहते। नंतर आपण पण आजून तरुण आहोत हे दाखविण्यासाठी सज शृंगार केला जातो तुकरामानी म्हटले आहे की,"का रे भुललासी वरलिया सोंगा " तरी मानुस वरचा पापुद्र थापतच राहतो। त्यामुले बाहेरचे सैंदर्य खुलत आसेल कदाचित पण आंतरिक सुन्दरता कशी येणार.आपण कधी या गोष्टीचा विचार करतो का? लग्नाच्या बाजारात मुलगा मुलगी दिसण्या वरच लग्न ठरवतात न? सजने हा गुणधर्म नसता तर जग तरी सुन्दर दिसले आसते का? जगातले सगळी सुन्दरता आपण पहु शकतो, आनुभावु शकतो, कारण त्याला परमेश्वराने सजवून आपल्या पुढे ठेवली आहे म्हणून, रोजचा सूर्योदय वेगला, रोजचा सूर्यास्त वेगला , वाहणारी नदी, तिची सुन्दरता वेगळी म्हणून नाविन्य टिकून आहे। सजने हे जन्मा बरोबर सुरु होते ते, आयुष्य संपे पर्यंत चालू आसते, मेल्या नन्तर प्रेताला सुध्धा सजवले जाते। सजने, सज्वाने हे जगाच्या अंता पर्यंत राहणार आहे.तो शब्द आसा सजुनच सामोरा आला आहे न? आज बस आता.

Sunday, March 28, 2010

२९/३/2010

कल खुप वेळ नेट वर होते खुप कही वाचले, खुप कही शोधले, कही माहीत करून घ्यायचा प्रयत्न केला लिहित पण होते काल पण आज काय लिहायचे हा प्रश्न माला रोज पडतोच.लिहायला लागले की विचार सुचत जातात पण जनिवपुर्वक ठरवून कही लिहायचे तर माला नहीं जमणार.आज जीमेल वर फोटो पाहत होते खुप आठवणी जहाल्या त्या अमेरिकेच्या फोटो पाहत होते सगले आठवत गेले, पाहिलेला सूर्योदय, ग्रांड कैनियन] लोस एंजिल्स वेगास, पोर्टलैंड, न्यू यार्क, खुप छान होते ते सगले, इतके कही सुन्दर ठिकाणे पहिली की बस। आता पुन्हा ट्रिप ठरवते आहे, आमरनाथ, कश्मीर, वैष्ण्विदेवी पाहू काय काय पाहता येते ते.ठरवत तर खुप कही आहे, पुन्हा फोटो, पुन्हा समाधान, न पुन्हा नविन कही तरी ध्यास आसेच चालू राहणार आयुष्यात पण म्हणून तरी आयुष्य पुढे पुढे जात आहे, नसता मला तरी या रोजच्या रूटीन च कंठला आला आसता। आज बस इतकेच

२८/३/10

लिहिता लिहिता एडिट करायला गेले न सगलेच विसरून गेले , का असे होत आसवे जरा सवय व्हायला हावी या सगळ्या गोष्टीची मग आपोआप जमेल हे असे लिहिणे देखील.चला एडिट यात आस्ते हे समजले तरी निवांत वेळ पाहिजे खरे म्हणजे, कही तरी लिहायचे आहे पण मी काही कोणी खुप महान नहीं आहे की माला सरे जमेलच म्हणून पण "कोशिश करके देखना " आसे कोणी तरी म्हटले आहे न आपण तेवढेच करायचे नंतर बाकी सगळ्या दुरूस्त्या, लिहीणे खरे तर आवघड नहीं पण इंग्लिश मधून मराठी लिहायचे आवघड आहे। जमेल पण सावकाश .जमाय्लाच हवे , जगात कोणतीच आशी गोष्ट नहीं की जी impossible म्हणता येइल .आज खुप छान लिंक होती टेम्पलेट मधे ब्लॉग तयार करायची पण dusrya लिंक डिलीट करताना नेमकी ती डिलीट zali कशी ती शोधायची ते ही नहीं माहित माला मग पुन्हा येइल या भरवशावर बसणार आहे अली की सेव करून ठेवेन तर विसरने माणसाला जमते का? जनिवपुर्वक विसरायचे म्हणून ठरविले तर तेच सारखे आठवत रहते, असे का?याला उत्तर नहीं। माणूस गोष्टी विसरतो म्हणजे विस्मृतीत त्या गोष्टी जातात म्हणून ते विसरतो लहानपण माला आठवत नहीं कारण त्या गोष्टी खुप पूर्वी घडून गेलेल्या आसतात त्याही पेक्षा त्या गोष्टी लक्षात ठेवण्य इतका आपला मेंदू त्यावेळी devolop zalela नसतो म्हणून पण मोठेपणी जेव्हा आपण खुप गोष्टी प्रयत्नानी विस्मृतीत ढकलतो, तरीही त्या नको तेव्हा बरोबर आठवतात, असे का? याला उत्तर नहीं। विसरन्य सारखे माणसाला वरदान नहीं कारन काल काय घडले हे मी विसरते म्हणून नविन गोष्टी करू शकते जर ते जमले नसते तर मानसे आपली दुखे विसरलीच नसती दुखाच का सुख सुध्धा ख़ुपवेला विसरावे लगते नहीं तर नविन सुखला कशी काय जगा मिळणार? मान सन्मानाच्या सुखत जर aadkun राहिलो तर नविन कार्य करुन नविन सन्मान कसा काय मिलवनर न? तसेच जुनी मानसे विसरून म्हणजे त्याना लांब करून नहीं तर नविन माणूस jodnyasathi जून्या माणासना जरा लम्ब ठेवावेच लगते न? नाही तर नविन नाती कशी जोडली जायची माणसाला आयुशात सुख न दुखाही वाट्याला येतात , त्या दोन्हीलाही सामोरे जाण्यासाठी पहिली गोष्ट विसरली पाहिजेच न? त्यासाठी देवाने मनाला ज़ोपेचे वरदान दिले आहे, सरे विसरून माणूस पुढे पुढे जाऊ शकतो नसता तिथेच थांबला आस्ता न एखाद्या दबक्यासरखा संकुचित जाला आसता । तसा संकुचितपना संपवा म्हणून तरी मागचे सगले विसरून पुढे चालत राहिले पाहिजे .

Thursday, March 25, 2010

२६/३/10

काल रात्रि मधेच जाग आली , न विचार पुढे पुढे धावायला लागले, आत्ता ते कही आठवत देखिल नहीं, तो क्षण आसतो तेव्हाच जर लिहिले आसते तर ते विचार कुठेतरी सापडले आसते। चालायचेच आत्ता जे लिहिले शाक्य होएल ते लिहिन विचार , माणसाला विचार सुचत कसे आस्तील? कोठून येत आसेल ही शक्ति। जन्मलेले बाळ देखिल zopet हसताना नसता रडताना दिसते त्या जिवाला देखिल कही दिसत असेल नक्कीच मग हे विचार खरच मागच्या जन्माची देन म्हणायची की मागचे विचार तसेच या जनमत येतात काहीच समजत नहीं पण जो विचार मी करते ते दुस्र्या कुणाचे वेगलेच आसू शकतात असे का? व्यक्ति तितक्य प्रकृति म्हटले जाते ते का? हे कशावरून ठरत आसवे, कोण देत आसेल ही बुद्धी.बोलताना, लिहिताना माला जे विचार सुचतात ते कोण निर्माण करत असेल घरचे प्रश्न सोडवताना मी जी पद्धत वापरते टी माजी मुले सुद्धा नाहीत वापरणार हे का घडते, तसा विचार करायला माला मज़े नशीब घेउन जाते की विचार काहीच समजत नहीं हे सुद्धा फ़क्त आपण ठरवत जायचे। न संपणारी प्रश्नावली आहे ही। याची उत्तरे माला तरी नहीं सापडली फ़क्त जे जे होएल ते ते पहावे एवढेच आपल्या हातात आस्ते.याची जाणीव ठेवून आयुष्य जगायचे म्हणजे खुप गोष्टी सोप्या होऊं जातात.

Wednesday, March 24, 2010

२५/३/10

काल लिहायचे होते पण कंप्यूटर बंद होता न मग राहून गेले लिहायचे.आज लिहिते आहे खरे पण कालचा मूड कही वेगलाच होता.काय घडते आहे न मी न सचिन मधे आम्ही बोलता बोलता कधी भांडायला लागतो काळात नहीं, असे का होत असेल, का दुखावले जातो असे.मी माज्या आस्तित्वा साठी धड्पदते आहे का? काय तसे माला तरी जाणवत नहीं.मी स्पष्ट सांगितले आहे की मी नहीं रहू शकत त्यांच्या जवळ कुठे तरी कही तरी चुकते आहे पण माला असे जाणवते की तिथे मी नहीं नीट पणे रहू शकणार चला जाऊ देत कुठे न कसे रहायचे हे आपण ठरविले तरी देवाची काय एच्छा असेल ते नहीं सगता येत.अत्ता पर्यंत मी किती धड्पदले की जे माला वाटते ते आयुषत घडावे पण शेवटी जे देवाला, नशिबाला मान्य आसते तेच घडत असते तरीही आपण किती बढाया मारतो न की मी हे करेन ते करेन किती वेळा तरी आनुभव घेउनही माणसाचा आहम जात नाहीच शेवटी नसता मी कुठे राहणार हे मी का ठरवत राहिले आसते.जाऊ देत यातून तरी कही शिकता येते का ते पहिन, नक्की विचार करेन या गोष्टीचा.माजी काहीच तक्रार नहीं या बाबतीत, जे वाट्याला येते ते बस स्विकरयचे नहीं तरी आपण काय करू शकतो या बाबतीत आयुषत जे समोर आले ते मुकत्यानी स्विकरलेच न? ते सहन करायची तकाद त्या नियंत्या कड़े मागायची बस तू जे देशील ते शांतपणे सहन करायची तकाद दे म्हणायचे, चालायला लागायचे.

Tuesday, March 23, 2010

२३/३/10

आज या कंप्यूटर वर खुप दिवसाने ओपन जाले आहे (खाते) का ओपन होत नव्हते तस नव्हते समजत पण आता लिहिता येइल खुप आठवणी मनात आसतात त्यातल्या कही इतक्य अचानक आठवतात की आपण कधीच तय विसरून गेलेल्या आसतो आजही असेच zale सहज आकाशात रात्रि चांदण्या चमकताना दिसत होत्या लाइट गेलेले अन saglikade अंधारच आंधर होता ग्यालरित zopalyavar बसलेले आसताना आकाशात चक्क चांदण्या चमकत होत्या सप्तर्षि स्पष्ट दिसत होते मग आठवली टी सोलापुर्ची गच्ची तिथून zople की आकाशात सगले तारे चमकताना स्पष्ट दिसायचे, मुलांशी गप्पा मारताना तारे दाखवत त्यांची नवे सांगत , त्यावरच्या गोष्टी सांगत zopun जायचो। आता पुण्यत पूर्ण आकाश कधी दिसतच नहीं एखादा टुकड़ा दिसतो न त्यातील दिसतील तेव्ह्ध्याच चांदण्या बघायच्या , त्यात polution mule तारे दिसणे आलभ्य लाभच म्हणायचा पण कल सप्तर्षि चांगले दिसत होते मग तो कल आठवला मुलाना गोष्टी सांगता सांगता येणारी zop आठवली कल किती भरभरा संपतो उद्या मुलांना मुले होतील तेहि आशच गोष्टी संगतील पण तेव्हा सपतरुशी, विंचू, शनि, मंगल, रोहिणी व्याध एकाच वेळी दिसतील? एक सप्तर्षि नि केवढा भुतकलाचा न भाविशाचा ही फेरफटका मारून आणला या आशाच आठवणी , तो काळ ते संभाषण, तो स्पर्ष, गोष्टी एईक्तानाचे हुंकार न विचारलेले प्रश्न sagle तसेच्या तसे जाणवत होते मुलाना कदाचित ते आठवणार नहीं, मी ही गोष्ट सारे इथे पुण्यत येउन विसरून गेले होते मज्यासठी तो काळ सुखाचा होता, सोबत नहीं mhannar पण मुलांची साथ होती, त्याना आई म्हणजे त्यांचे जग होते सगले सांगायचे ते आईला मागायचे ते आईला तिथे सगल्या प्रश्नाची उत्तरे आसनार हा विश्वस होता , बघता बघता त्यांच्यात विश्वास निर्माण jala न आईचा हात कधी सुटला ते कुणालाच समजले नहीं। हात सुटला, आत्मविश्वास आला ही खुप चांगली गोष्ट त्यासाठी तर जगले मी पण तरीही तो काळ फ़क्त आठवणीत राहिला ही हुरहुर कुठेतरी आहेच कालच्या सप्तर्षि नि हुरहुर जागवली चालायचेच, कालाचा महिमा म्हणायचे न विसरून जायचे नविन कही तरी aathvnyasathi.

Sunday, March 21, 2010

२२/३/10

परवा लिहिलेले शोधत आहे पण सापडत नहीं तय दिवशी आर्धावट राहिले होते पण जावू देत नविन लिहावे आज तेच जास्त चांगले। काय चांगले हे माणसाला चांगले समजत आस्ते। स्वताहाचे चांगले तर लगेच जाणवते, त्याप्रमाणे वागण्याचा मानुस प्रयत्न करतो पण कधी कधी एखाया ठिकाणी समजुन सुधा मानुस दूसरी कड़े ओढला जातो, कही तरी रुनौबंध आसतात की ते त्यावेळी घडून जाते। कितेकदा त्याचा परिणाम आयुशावर होतो चांगल्या vaetachi जान आसुनही चंग्ल्याची सांगत सुटते असे का घडते ते नहीं सांगता येत, कदाचित त्याला प्रारब्ध म्हणत आसवेत तसे एकासाठी चांगले ते नेमके दुसर्यासाठी आपशाकुनी आसू शकते आसे का याला उत्तर नहीं उद्या काय घडणार हे माहित नसूनही आपण आयुष्याचे plan करतोच न? ते पूर्ण व्हावेत म्हणून धडपद्तोच न? तरीही कुठेतरी का हे प्रश्न मनात आस्तातच हे न संपणारे प्रश्न zop उडवतात कधी कधी मनाला चांगले वाटणारे जगाला नहीं वाटत की ते चांगले आहे मग पटते ते करायचे की जगरहती ती स्विकारायची हा मोठा प्रश्नच आसतो असे किती तरी न सुटलेले प्रश्न बरोबर घेउनच आपण जगत असतो, त्याची उत्तरे माहित नसतात, कितेकदा माहित असुनही त्याकडे काना डोला केला जातो हा स्वाभाव बनू शकतो पण त्यावर उपाय काहीच नसतो। रोज रोज आवडनारे जेवण सुधया आरोग्यासाठी रोज खाणे नहीं चांगले ठरत मग कितीतरी निर्बंध असलेल्या गोष्टी काढून टाकाव्या लागतातच खुप लिहायचे पण आज बस इतकेच। पुन्हा केव्हा तरी

Tuesday, March 16, 2010

१७/३/10

आज पाहत होते की काय काय करता येते ते पण तसे माला जरा आवघड जात आहे , मी बारह डाउनलोड केले पण माला कही जमेना की कसे लिहावे त्यात काना मात्र नहीं सापडत आहे पण तिथे जाता तरी आले जमेल haluहलुं आज जमेल वर लिहू का? आयुष्यात खुप गोष्टी जमवाव्यa लागतात १ ली गोष्ट म्हणजे स्वताला सावरून २ र्याला समजुन घेणे आपले विचार vegle असतात समोरच्याचे vegle जे माला म्हणायचे नेमके त्याच्या विरुध २रा म्हणत असातो पण त्याला समजुन घेणे जमले पाहिजे हे जमवता जमवता लहानपण संपून जाते शालेय जीवन माजे खरे म्हणता म्हणता संपते तिथे विचार पक्के नास्तात ते तसे होता होता carrier चा विचार आसतो पाहिजे ते carrier फार थोड्या लोकांच्या वाट्याला येते बरेच जानना जे वाट्याला येते ते carrier निवडावे लगते। खुप वेला परिस्थिति आशी असते की समोर दिसणारे carrier मुकाट्याने स्विकरावे लगते मग ते carrier जमवता जमवता निम्मी तकाद संपून जाते त्यातच जोदीदाराची ओढ़ लागली की आयुष्य अनखिंच adjustकरवे लगते। स्विकरलेला जोड़ीदार समजुतदार आसेल तर फारसे प्रॉब्लम नहीं येत पण तसे नसेल तेर सार कही आपल्याला जमववे लागते। असे जमवता जमवता आपण आयुशाचे रंगवलेले चित्र पर बदलून जाते जेंव तय चित्रावर नजर टाकतो tenva ते आपण ठरविल्या पेक्षा किती वेगले ज़ालेले आसते। अक्षरशः माणसाचा माकड ज़ालेले आसते। पण त्याला कही इलाज नसतो। आपल्या हातात फ़क्त चलने आसते रास्ता २ र्यनेच ठर्विलेला असतो त्याला कदाचित नियति म्हणत असतील । असे जमवता जमवता सारी ताकद संपते १ क्षण आसा येतो की विचार करायचेच विसरले जाते काहीही न ठरवता तय नियतीच्या हातात आपले तरु दिले जाते , हे बरोबर की चुक हे नहीं ठरवता येत पण मन तितके उद्विग्न होऊं जाते। आज इतकेच बस लिहिन पुन्हा कधीतरी असेच निवांतपणे

Monday, March 15, 2010

मी ही लिंक धोंडोपंत उवाच या ब्लॉग वरुण घेतली आहे कारन मेधा टी वाचेल न माला wwwbaraha.कॉम कसे लोड करायचे ते सांगेल न माला direct मराठीत लिहिता येइल। Dhondopant uvach ha blog vach , Medha bhanat ahe, pakka kokni. me aaj baki kahi nahi lihit pan mag ligita yeil tasa barach vel ahe n mukhya mhanje manapasun lihave ase vatlya shivay lihine hot nahi. tyamule he fakt Medhasathi, malahi ang kase down load karayche mag sahaj marathit lihita yeil aplyala. Navin varshachya Shubhecha tula n Javai bapu na. Navin varshat navin pahunyachi navin batmi denar na?
॥ श्री स्वामी समर्थ॥
लोकहो,
देवनागरीत टंकलेखन करण्यासाठी काय करावे? असा प्रश्न काही लोकांनी मागील लेखावर विचारला.
कुणी इतर संस्थळांवर जाऊन, तिथे टंकन करून, मग तो मजकूर आवश्यक त्या ठिकाणी चिकटवतात.
असे करण्याची अजिबात आवश्यकता नाही.
मराठीत ( देवनागरीत) लिहिण्यासाठी www.baraha.com येथून संगणकप्रणाली उतरवून घ्यावी. ती आपल्या संगणकावर जतन करावी आणि सरळ लेखन सुरू करावे.
इतर भारतीय भाषांसाठीही म्हणजे कन्नड, तामीळ, तुळू, मल्ल्याळम, पंजाबी, गुजराती, बंगाली, ओरिया या भारतीय भाषांसाठीही त्याचा वापर करता येतो.
बारहा वापरतांना कुठलाही मजकूर कॉपी / पेस्ट करत बसण्याची गरज नाही. बारहा सुरू करून, त्यात MA unc म्हणजे मराठी युनिकोड हा पर्याय निवडून,.......... " हाण तुझ्याऽऽऽऽयला"....... अशी सणसणीत मराठमोळी शिवी हासडून, सरळ कळफलक (की बोर्ड) बडवायला सुरूवात करावी.
त्यामुळे बारहा वापरा. मातृभाषेतच लिहा. मराठीचा मळा फुलवा.आपला,
(आग्रही) धोंडोपंत

Sunday, March 14, 2010

१५/३/10

उदया गुढी पाडवा मराठी नविन वर्षा , सगळ्याना subhecha दिल्या की बारे वाटेल आज कही संकल्प करायचे तर कही ठरवले नहीं मेधाचा मस्त मेल आला तशी आज बरीच सावरली आहे, एकतेपाना कधी तरी जाणवतो पण असे उदास फार थोड़े वेळा होते। कोणतीही नविन गोष्ट मानत उत्साह निर्माण करते तसेच नविन वर्षा ही बरेच कही संकल्प केले जातात,पुर्ण न ज़ालेल्या संकल्पंची रुख रुख टोचत असते। मानत घर करूँ बसलेले संकल्प मनातून बाहेर नाहीत जात जाशी आवडती गोष्ट पण तरी ते संकल्प नाहीत पुर्ण होत चालायचेच यालाच जीवन म्हणत असतील आर्धि मुर्धि स्वप्ना गोला करायची न नविन स्वप्नामागे धावायाचे। तसेच १ स्वप्ना की नविन वर्षा आपल्यासाठी कही तरी नविन घेउन येइल पण ५२ वर्षा ज़ल्यावर ते ही जुने होउन जाते मनातली उदासी संपली तर हे सारे संपेल तर ही संपवु या।
नविन वर्षाच्या मनापासून Shubhechcha

Wednesday, March 10, 2010

11/3/10

रोज कही तरी लिहायचे , पण के लिहिणार न? लिहिणे, खरेच असे लिहित गेले की लिखाण जमेल का? हो प्रयत्न तेर केला पाहिजे, मजा ब्लॉग कोणी वाचावा असे नहीं मी लिहिते ते माज्या स्वता साठी। लिहिताना फोचार सुचत जातात, budhi कम करायला लगते। मग विचार positive कसे बनवायचे ते जमायला लगते। अनेक courses आहेत की जे आपले विचार positive करण्यासाठी धडपडत आसतात पण तो विचार अपनच positive बनवायला हवा न? त्यासाठी खुप मनाची तयारी करावी लगते। माज्या सारख्या एकट्य व्यक्तीला तर मनाशी खुप zagdave लगते पण इलाज नहीं स्वतहाला जगात आहे ते आयुष्य समधानानी जगायचे तर हे केलेच पाहिजे। त्यासाठी लिहिणे हे माला तरी फार गरजेचे वाटत गेले कारन माला नहीं कोणाशी आपले मन मोकले करता येत, आगदी मुलं जवळ सुद्या मग असे लिहायचे आपल्या भावनाना वाट करूँ द्यायची अन येणार्य नव्या क्षनाना सामोरे जायचे त्यामुले लिखाण हे मज्यासठी must आहे । लिहायचे न सारे असे only mine म्हणून जतन करायचे । कोणी वाचावे म्हणून नाहीच आहे हे तर स्वतहाला कुठे तरी expose करावे .