Friday, September 14, 2012

कालच्या इतकी आज disturb नाही आहे. जे जे असेल भाळी  ते न टळेल कधीकाळी. आज पासून तो विषय सोडून लिहायचे, काही न काही problem सगळ्यांनाच असतात, त्याला मी कशी अपवाद असेन?


  • आज सकाळी redio  एकात होते न सोलापूर नभोवाणीवर "सुनिता तारापुरे" ;या  मुख्य निवेदिका असाव्यात, कारण प्रत्येक चांगल्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग, शास्त्रीय गाण्याचा कार्यक्रम आसो, कि खेलखीलाडी त्या आपल्या त्यांच्या कणीदार स्पष्ट आवाजात विशिष्ठ लाईत  निवेदन करतात, इतके कि आता त्यांचा आवाज कुठेही बाहेर एकला कि मी त्यांना ओळखू शकेन. 
  •  अशी कितीतरी गोष्टी असतात कि आपण त्याच्या नुसत्या वासाने ऐखांद्याला ओळखू शकतो.रस्तापेठेत  अपोलो talkage कडे गेलो कि आसाच मस्त कॉफीचा वास  येतो, पाउस पडत असेल तर हा वास अक्षरशहा वेड करतो पण coffee प्यायला नाही मिळत कारण तिथे coffee ची गिरणी आहे हॉटेल नाही 
  • तसा रेल मध्ये सोलापूर वरून पुण्याला जाताना तेम्भूर्णी गेले कि एक बटाटे वाडेवाला येतो त्याच्या वड्याचा  वास आधीच्या डब्यात तो आला कि यायला लागतो, भूक नसली तरी वाडे घ्यायला लावतो 
  • तसेच डोंगरावर पावसाळ्यात गेलो कि त्या पावसाचा, झाडांचा, वेलींचा, मातीचा अन आपल्या मनस्थितीचा  एक orignal वास येतो तो आला कि आपली पावसाळी सहल सुरु होते ती दमून परतताना अंगात अगदी भिनून जाते, पुन्हा पुढच्या वर्षी परत येण्याचा संकल्प करूनच.
  • साहेबाच्या केबिन मधून येणाऱ्या बेलचा १ आवाज आसतो, आपल्या मनात ज्या दिवशी भीती असेल त्या दिवशी तो आपल्या साठीच बोलावणे घेऊन येतो, हे हमखास घडते याचे कारण नाही माहित.
  • आज लवकर जायचे ठरवले कि साहेब उशिरा पर्यंत थांबतात, बस मिळत नाही, काही तरी घडते न नाराजी मात्र वाट्याला येते याची जाणीव कुठे तरी आधीच माणसाला होते ती का हे नाही सांगता येत तसेच त्या विशिष्ठ वेळी तीच गोष्ट का जाणवते तेही नाही सांगता येत.
  • समुद्रावर गेलो कि तिथल्या वनस्पतींचा, तिथल्या झाडांचा आगदी माशांचा सुध्या वास येतो, मग तो वास इथे शहरात कुठे तरी आला कि झटकन तो समुद्राकाठी नेऊन सोडतो, त्या एका क्षणात मन कुठेकुठे भटकून येते हे कधी अनुभवले आहेत.
  • डोंगर कपारीत भटकताना पाण्या अभावी घशाला पडलेली कोरड न त्या क्षणी झुळू झुळू वाहणाऱ्या पाण्याचा आवाज , ते पाणी दिसे पर्यंतच किती पाणी पिऊ न किती नाही असे होऊन गेलेला क्षण अन लोकाल पकडण्यासाठी घेतलेली धाव, बाटलीतले संपलेले पाणी, न कोणीतरी तिसर्याने दिलेले पाणी  समाधान कदाचित तेच असेल पण मन भरून पावणे समाधानानी ते नक्कीच वेगळे आस्ते, इथे माणुसकीने मन भरते तर तिथे निसर्गानी भरभरून दिलेल्या गोष्टीने. यात श्रेष्ठ काय हा विचार नाही  पण या दोन्ही भावना निश्चित वेगळ्या आहेत.
  • माझ्या लहानपणी मी राजगडावर बालेकिल्ल्यावर गेले होते तिथून पाहिलेले दृश्य, खाली दरीत डोकावले कि धुक्याच्या पडद्यावर आपलाच चेहरा दिसतो आगदी आरशात पहिल्या प्रमाणे पण त्या भोवती सप्त रंगांची वलय असतात, आपण देवाच्या चेहर्या भोवती काढतो तशी आजही इतक्या दिवसा नंतर ते आठवते.  पुन्हा जाऊन पाहायला पाहिजे कि तो अनुभव पुन्हा येतो का? त्याचे कारण नाही माहित मला, ते हि विचारले पाहिजे कुणाला तरी पण आधी जाऊन पहिले पाहिजे न तेव्हा धुके हि पाहिजे.
  • बाकी आता उद्या लिहावे 

No comments:

Post a Comment