Friday, September 14, 2012

kalay tasmeyen maha


  • काल निर्णय झाला न मी रात्री थोडी निवांत झाले. ठरवले कि सचिनशी काहीच बोलायचे नाही, पण सईला भेटायला मात्र जायचे, तिला घेऊन बाहेर जायचे. समजा तिला बाहेर नेण्याला विरोध झाला तर? तेव्हाचे तेव्हा पाहू आज तरी तो विचार करायचा नाही. जायचे तिला बाहेर नेऊन आणायचे घरात येऊन आपण ठरविलेल्या खोलीत वाटते तितके २ तास, ३ तास बसायचे न नंतर निघून यायचे, त्यांनी कोणी बोलावे हि अपेक्षा नाही करायची. मला समजते आहे कि यात सचिन ला बरेच सोसावे लागणार आहे, मी हि आज सोस्तेच आहे न? शेवटी ज्याचे त्याचे नशीब आस्ते आपण नाही  ते बदलू शकत, तसा प्रयत्नही नाही करायचा मला. आज तरी असे ठरवीत आहे, त्यातून काय  वाट्याला येते ते पाहू सध्या तरी कोणालाच काहीच नाही बोलणार आगदी सचिन ला सुद्धा . बाकी तर कोणाचा काही संबंधाच नाही. खरच मी इतकी वईट वागते का?
  • कुठे तरी या गोष्टी समाजात जाणवत असतील न? किती ठिकाणी यैकात आले कि असे झाले न प्रकरण शेवटा कडे चालले आहे. का या मुली आशा वागत असतील त्यांना त्यांचे संसार नको असतात का? तसे पहिले तर सासर म्हणजे फक्त नवरा, मुल न स्वतः एव्हडेच आस्ते का? बाकी कुणाचा विचार नाही येत का? तुमचे संसार उभे राहण्यासाठी कुणी तरी कुठे तरी बलिदान दिलेले आस्ते ते असेच सोडून द्यायचे का? त्याला काही किमतच नाही का? स्वतः पुढे दुसर्याचा विचार करायचाच नाही का? का घडते असे सारे, माणूस सेल्फिश होते आहे कि त्याची नितीमत्ता कुठे तरी संपत चालली आहे. 
  • हे सारे प्रश्न कोणाला विचारायचे, कुठे मिळतील याची उत्तरे ? माझ्या सर्खीने काय करायचे, सगळे आयुष्य  मुलांसाठी जगले न एकदम त्यांना विसरून जायचे तिथे माझ्यासाठी काहीच स्थान नाही का? काडी  काडी  एकत्र करून जमवलेला संसार मुलांच्या स्वाधीन  करायचा, न आपण साध्या शब्दांसाठी मोताद व्हायचे का? कुठे जाणार आहे हे सारे ?




No comments:

Post a Comment